Thursday, June 2, 2011

आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...

विद्युल्लता
लखलखतात दशदिशांतून
रुद्रध्वनी उन्मळतो
आकाशगर्भातून
ऒंकारस्वर करीत
सोसाटत हवा वाहते अशी कि
धरतीने घातले आहे
लोटांगण
या शिवमय अवकाशास
जाण्यासाठी शरण!

मीही विनम्र
कणाकणाप्रमाणेच या चराचराच्या
व्रुक्षवेलींसारखा आणि
थबकलेल्या ...
ओथंबलेल्या
चिंब भिजल्या
क्षणांसारखा
अंतरात नाद अनाहत...
ॐ त्र्यंबकं यजामहे...
तोही भिजलेला
चिंब चिंब झालेला...
स्वर तो अविरत
या वेड्या
अनाहुत पावसासारखा...

आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...