विद्युल्लता
लखलखतात दशदिशांतून
रुद्रध्वनी उन्मळतो
आकाशगर्भातून
ऒंकारस्वर करीत
सोसाटत हवा वाहते अशी कि
धरतीने घातले आहे
लोटांगण
या शिवमय अवकाशास
जाण्यासाठी शरण!
मीही विनम्र
कणाकणाप्रमाणेच या चराचराच्या
व्रुक्षवेलींसारखा आणि
थबकलेल्या ...
ओथंबलेल्या
चिंब भिजल्या
क्षणांसारखा
अंतरात नाद अनाहत...
ॐ त्र्यंबकं यजामहे...
तोही भिजलेला
चिंब चिंब झालेला...
स्वर तो अविरत
या वेड्या
अनाहुत पावसासारखा...
आज पावसाळ्याचा हा पहिलाच दिवस...
Subscribe to:
Post Comments (Atom)
वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम
एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...
-
पानिपत ही मराठ्यांची एक घोर शोकांतिका मानली जाते. पानिपत युद्धात महाराष्ट्रात घरटी बांगडी फुटली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ह्या शोकांतिके...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
No comments:
Post a Comment