Monday, August 12, 2013

तो अनादि स्वर...

मला अशा निवांत सायंकाळी
एकच धून आवतन देत असते
विश्वाच्या प्रगाढ पोकळीत
सामावलेल्या
माझ्याच आत्म्याच्या
आकांतमय
विश्वेशाची
...

त्या विश्वधूनीत
घुमत असतो माझा
आणि
अगणित चिरवेदनांचा अनादि
स्वर
जो चिरत जातो हृदये अगणित माझी
तो स्वर
असतो माझ्या विश्वेशाचा
विश्वालाच अनंत
छळणारा
नि उद्वेलित करणारा

तो स्वर...!

माझ्या अगणित हृदयांना
माझ्याच अनंत आत्म्यांना
माझ्याच अनंत शरीरांना
छळनारा
आवतन देत असतो
पुन्हा पुन्हा
तो स्वर
आणि अनामपणे बनलेली ती विश्वधून
बेफाटपणे
माझ्या आणि माझ्या अनंत आत्म्यांच्या
शरीरांचे
गळे आवळत!

माझे कान का बहिरे होत नाहीत?
माझा आत्मा का मरत नाही?
आणि तो विश्वेश
विश्वापार
का हद्दपार होत नाही?

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...