Sunday, August 4, 2013

पण माझे मला ते गांव दे...

माझिया क्रोधाला
तू कोणतेही नांव दे...
माझिया वेदनांना
आधी एक विसाव दे...

गांव माझे लुटलेले
भग्न घर माझे झाले
(असो...पण आता तरी)
असत्यांच्या वर्षावांना
थांबण्याची साद दे....

चि-या-चि-यांना करून गोळा
बांधेन माझे घर पुन्हा
गांव तसेच असेन उभे
पण सत्यांना दाद दे....

रात्रींना बहरू दिले पण
सुर्यांना जखडू दिले
हाच गड्या जर आव तुझा
तर क्रोधांना वाव दे...

हेही नाही तेही नाही
ऐकले आहे खूप अता
मैत्रींचे जिव्हार सोसले
मग अटळ ते घाव घे...!

पण माझे मला ते गांव दे...

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...