Tuesday, August 12, 2014

आम्ही माणूस आहोत...

आभाळ तुटून कोसळतय म्हणताय?
हरकत नाही
तुटू देत
आम्ही आमच्या अंगणात, शेतांत,
माळरानांत
त्या कोसळत्या
आभाळाचे कोसळलेले तुकडे वेचू
तेच आम्ही आमच्या अंगणांत
शेतांत
माळरानांत
पेरू...

त्यातून अनंत आभाळे
पुन्हा उगवू...
आमची कोसळलेली घरे
पुन्हा उभारू...

आम्ही माणूस आहोत...
विनाशातुनही सृजन करणारे!

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...